श्री. द. मा. मिरासदार

mirasdar.jpg

श्री. द. मा. मिरासदारांनी वाचकांना खळखळून हसवलं. बारीकसारीक तपशीलांसकट उभी राहणारी पात्रं, भन्नाट संवाद आणि जीवनाचं वास्तव चित्रण हे त्यांच्या विनोदकथांचं वैशिष्ट्य.

कथाकथन या प्रकाराला ज्यांनी महाराष्ट्रात प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यातले मिरासदार हे आघाडीचे शिलेदार. शंकर पाटील व माडगूळकरांसोबत कथाकथनाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. ग्रामीण आणि विनोदी कथांची जी अवघड वाट त्यांनी चोखाळली, ती इतक्या वर्षांनंतरही सवघड झालेली नाही, आणि इथेच मिरासदारांच्या कथेचे यश आहे..

'चकाट्या' या कथासंग्रहातील 'अभ्यास' ही कथा खुद्द श्री. द. मा. मिरासदार यांच्या आवाजात..