नेमस्त

धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हांच्या ओळी
तो शहारला नेमाने ही कविता सुचतेवेळी

नित्यागत उमलत गेली हळुवार कल्पना त्याची
सवयीचा सुगंध आला होताच फुले शब्दांची

नेमस्त हरखला तोही द्याया ना उरले काही
नेमस्त चरकला फिरुनी .."ही शेवटची तर नाही?"

रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते..

- वैभव जोशी

6.75
Your rating: None (8 votes)