

एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा प्रत्यय येतो तो आरती प्रभूंच्या कवितेत..या रसरशीत, चिरतरुण, चित्रमय कवितेतील जोष, नाद, लय, सामर्थ्य विलक्षण मोहवून टाकणारं असंच आहे... स्वतंत्र जाणिवा आणि स्वतंत्र अशी वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्ती यांमुळे आरती प्रभूंची कविता जीवनाशी एक नवं नातं निर्माण करते...
श्री. आरती प्रभू यांच्या निवडक कवितांचं वाचन केलं आहे श्री. विक्रम गोखले यांनी...