परिहार सेवा - काळाची गरज
माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू ठरलेलाच असतो. कधी, कुठे, कसा मृत्यू येणार ह्या तपशीलांमधे फरक पडला तरी कधी ना कधी हे घडणार हे आपल्या सगळ्यांना माहित असतं, पण आपण तो विचार कानाआड टाकून जमेल तेवढ्या उत्साहानं, आशेनं जीवनाचा उपभोग घेत असतो.
एक व्यक्ती म्हणून हे बरोबरच आहे. शेवटाच्या, भविष्याच्या विचारानं वर्तमानकाळ का खराब करायचा?
पण समाज म्हणून, समाज चालवणार्या संस्थांना याचा विचार करावा लागतो, तरतूद करावी लागते. त्यातूनच परिहार सेवेचा जन्म झाला.
इंग्रजीत ज्याला ’पॆलिएटिव्ह केअर’ म्हणतात त्याला मराठीत ’आधिव्याधि परिहार’ म्हणता येईल. ह्याचेच सुटसुटीत रूप - परिहार सेवा.