केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे फार...
व
याची पहिली पंधरा वर्षं पालघरजवळच्या एका गावी काढल्याने त्यावेळी माझ्यासाठी माझा देश म्हणजे, पालघर आणि आसपासचा परिसर, एवढाच होता. मात्र निसर्गानं या परिसराला भरभरुन दिलंय. गावाजवळून वाहणारी सूर्या नदी, पूर्व-पश्चिम दोन्ही दिशांना डोंगर आणि टेकड्या, जवळच केळवे, सातपाटीचा समुद्र... त्यामुळे निसर्गाशी जवळीक आपसूकच झाली.
पुढे कॉलेज आणि इंजिनीअरिंगसाठी मुंबईला आल्यावर मात्र हा देश, हे जग फार मोठं असल्याचा साक्षात्कार झाला. त्यावेळी ट्रेकिंगचा चांगला ग्रूप जमला आणि आजूबाजूचे छोटेमोठे ट्रेक केले. यामध्येच कधीतरी फोटोग्राफी आणि चित्रकलेचा छंद जडला.