सागरपरिक्रमा
एकट्याने समुद्रप्रदक्षिणा करणारे आज १७६ लोक असले तरी समुद्रप्रदक्षिणेचा प्रयत्न करून अयशस्वी होणार्यांची संख्या कितीतरी जास्त आहे. एव्हरेस्टावर जाणार्यांची, चढाई पूर्ण न करणार्यांची, वाटेत मरण पावणार्यांची संख्या सर्वांना माहीत असते. पण समुद्रप्रदक्षिणा करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणार्यांची संख्या कोणालाच माहीत नाही. कोणीतरी कुठल्यातरी बंदरावरून प्रदक्षिणेला सुरुवात करतो आणि दोन महिन्यांनंतर त्याचा जगाशी संपर्क तुटतो. संपतं सगळं. खूप कठीण आहे हे. त्यामुळे यश मिळेलच असं नाही, हे मला ठाऊक होतं.