निसर्गायण
नैसर्गिक भरार्या | aschig |
केल्याने देशाटन (जलरंग) | पाटील |
पर्यावरण, संशोधन आणि मी... | अनीशा |
सात पर्यांची कहाणी | स्मिताके |
लेह-लडाख मधील ढगफुटी | शंतनु |
बागवासरी | विद्या हर्डीकर-सप्रे |
(वरीलपैकी कुठल्याही प्रकारात न बसणारं साहित्य)
नैसर्गिक भरार्या | aschig |
केल्याने देशाटन (जलरंग) | पाटील |
पर्यावरण, संशोधन आणि मी... | अनीशा |
सात पर्यांची कहाणी | स्मिताके |
लेह-लडाख मधील ढगफुटी | शंतनु |
बागवासरी | विद्या हर्डीकर-सप्रे |
मी
आपल्याला नक्की काय करायचं आहे, हे या तरुणांना पक्कं ठाऊक होतं. हवं ते मिळवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली, कष्ट केले, आणि निवडलेल्या क्षेत्रात यश मिळवलं. पालकांनीही त्यांना साथ दिली. प्रामाणिकपणे काम करून, विचारांशी ठाम राहून हवं ते साध्य करता येतं, आणि त्याचा देशाला, समाजाला फायदाच होतो हे या तरुणांनी सिद्ध केलं आहे.
या कादंबरीत आपले आयुष्य गमवावे लागलेला टॉम रॉबिन्सन, विक्षिप्त आणि हट्टी वडिलांमुळे घराबाहेरच्या आयुष्याला पारखा झालेला आर्थर रॅडली आणि बालपणातली निरागसता, भाबडा विश्वास संपलेली स्काऊट असे किमान तीन तरी मॉकिंगबर्डस् आहेत. पहिला सामाजिक पातळीवर; तर बाकी दोघे वैयक्तिक, खाजगी पातळीवर. पण एकाच पुस्तकात कुठेही मुद्दामहून रचल्याचा संशयही न येता या तीन अपरिहार्य कहाण्या एकाच कथानकात फार सुरेखपणे गुंफल्या गेल्या आहेत.
'टू
यशोदा वाकणकर ही डॉ. अनिल अवचट व डॉ. सुनंदा अवचट यांची धाकटी मुलगी. शाळेत असताना एपिलेप्सी या व्याधीमुळे यशोदाचं आयुष्यच बदललं. काही वर्षांपूर्वी एका यशस्वी शस्त्रक्रियेनंतर यशोदा व्याधीमुक्त झाली. अशीच व्याधी असलेल्या अन्य लोकांसाठी काहीतरी उपक्रम हाती घ्यावा असं तिला वाटलं, आणि त्यातूनच एपिलेप्सीच्या रुग्णांना हरप्रकारे मदत करणार्या 'संवेदना फाऊंडेशन'ची स्थापना झाली. आज भारतभरातील एपिलेप्सीच्या रुग्णांसाठी 'संवेदना' हा एक फार मोठा आधार आहे.
वा
रेमाप आणि वैविध्यपूर्ण सृष्टिसौंदर्य बहाल झालेल्या आपल्या देशाची सफर घडवून आणल्याशिवाय 'निसर्गायण' पुरे कसे व्हावे? निसर्गवाचनाला भौगोलिक सीमारेषांची अट नसली, तरी मनीमानसी रुजलेल्या (स्व)देशभानात सर्वांत मोठा वाटा निसर्गचित्रांचा.
हीच ती अपूर्वाई आपल्या देशाची, मातीची! देशातील प्रत्येक प्रांताचे केवळ नैसर्गिक वैभव डोळेभरून पाहायचे म्हटले तरी किती कालावधी लागेल...
तूर्तास आपल्या देशातील चार प्रांतांची ही 'स्वतंत्र हिरवी अभिव्यक्ती'*. विराट आकाश आणि जलप्रपात पाहूया चंदन मोगरे यांच्या कॅमेर्यातून...
प्रशासकीय यंत्रणा आणि संवेदनशीलता यांचा काडीचा संबंध नाही, असा सर्वसाधारण समज प्रचलित आहे. या समजाला थेट छेद देण्याचं फार महत्त्वाचं काम श्री. अजित जोशी यांनी केलं आहे. श्री. जोशी हे हरयाणा कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. २००३ साली ते यूपीएससीच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आणि देशात २९व्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले. जेमतेम सहा वर्षांच्या काळात श्री. अजित जोशी यांनी अनेक लोकोपयोगी योजना राबवून प्रबळ इच्छाशक्ती व समाजाभिमुख दृष्टिकोनाच्या जोरावर किती मोठं काम उभं करता येतं, हे दाखवून दिलं आहे.
चि
त्रकला ही माझी आवड. त्यातही व्यक्तिचित्रं जास्त लाडकी.
गेल्या काही वर्षांत काढलेली ही चित्रं तुमच्यासमोर मांडतो आहे. ह्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या सगळ्या व्यक्ती त्यांच्या कर्तृत्त्वामुळे जगप्रसिद्ध झालेल्या आहेत.
चित्रमालिका पाहण्यासाठी खालीलपैकी कुठल्याही प्रकाशचित्रावर टिचकी मारा.
'वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', 'जन्म', 'लालबाग परळ' असे चित्रपट असोत, किंवा 'चार दिवस प्रेमाचे', 'एक रिकामी बाजू', 'दलपतसिंग येता गावा' यांसारखी नाटकं, वीणा जामकर या तरुण अभिनेत्रीचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे वीणाने एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. तिची भूमिका असलेले अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गाजले आहेत. 'पलतडचो मुनिस' हा तिची प्रमुख भूमिका असलेला कोंकणी चित्रपट यंदा बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला.
'छोट्याशा सुट्टीत', 'फ्रिजमध्ये ठेवलेलं प्रेम', बेड के नीचे रहनेवाली', 'तू', 'चारशे कोटी विसरभोळे', 'गार्बो', 'नाणेफेक', 'मात्र रात्र', 'काश्मीर काश्मीर' अशा दर्जेदार नाटकांमुळे मोहित टाकळकर म्हणजेच सकस नाट्यानुभव, हे समीकरण आता रूढ झालं आहे. एक प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून त्याने ओळख तयार केली आहे. 'आसक्त' या संस्थेद्वारे त्याने उत्तम नाटकं व कलाकार रसिकांसमोर आणले आहेत. महाराष्ट्रातील नाट्यचळवळीला एक वेगळी दिशा देण्यात मोहितचा फार मोठा वाटा आहे. मोहितच्या नाटकांमुळे उत्तम प्रेक्षक तयार होणं, ही एक अतिशय महत्त्वाची घटना आहे.